किनाऱ्यावरच्या महिला उद्योजिका
अलोक अर्जुन अलका पवार
काही दिवसांपूर्वी रत्नागिरी मधील दापोली तालुक्यातील हर्णे बंदरावर जाणे झाले. आता बंदर किंवा समुद्रकिनारा म्हणल तर काही ठराविक गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहतात. एक तर पर्यटन आणि दुसरे म्हणजे मासेमारी. आपल्याला शक्यतो बऱ्याच व्यवसायांमध्ये पुरुष मंडळी पुढाकाराने पुढे दिसतात. मासेमारी हा व्यवसाय पण पुरुषांचे वर्चस्व असलेला एक प्रमुख व्यवसाय. हर्णे बंदरावर देखील प्रामुख्याने समुद्रात जाऊन मासे पकडून आणायचे आणि त्यापासून आपले उत्पन्न कमवायचे हा येथील लोकांचा आणि प्रामुख्याने पुरुषांचा व्यवसाय. मात्र मला या बंदरावर काहीसे वेगळे चित्र दिसले जे महिलांचे महिला उद्योजिका होण्यास भाग पाडते.
No comments:
Post a Comment