Wednesday, 3 January 2024

सावित्रीबाई फुले : दि मॅनेजमेंट गुरु

 सावित्रीबाई फुले : दि मॅनेजमेंट गुरु

© डॉ. अलोक पवार



आज सावित्रीबाई फुले यांच्या विषयी काहीतरी वेगळे विचार मांडावेसे वाटले. "सावित्रीबाई फुले : दि मॅनेजमेंट गुरु", हा म्हणजे त्या काळी एम. बी.ए. अशी पदवी भारतामध्ये अस्तित्वातच नव्हती. आणि स्त्री असलेल्या सावित्रीबाईंनी ती मिळवली होती असेही नव्हते. मात्र तरीही सावित्रीबाईंना मॅनेजमेंट गुरु म्हणणे हे थोडे विचार करण्यासारखे नाही. एखाद्याला खरे व्यवस्थापन कळले आणि त्या व्यवस्थापनातील कार्य त्याला व्यवस्थित रित्या कळली तर तो मॅनेजमेंट गुरु म्हणून गणला जातो. आमच्या मॅनेजमेंट मध्ये पाच कार्य अतिशय महत्वाची म्हणून समोर येतात, प्लॅनिंग ( नियोजन), ऑर्गनिझिंग ( आयोजन), स्टाफिंग ( कर्मचारी जोपासना), लीडिंग ( नेतृत्व) आणि शेवटचा कंट्रोलिंग ( नियंत्रण) या पाचही कार्यांकडे बघता या सावित्रीबाई फुले यांची जीवन गाथा कशी समर्पक आहे हे दिसून येते.

प्लॅनिंग या कार्यामध्ये काही Goal निर्माण करावे लागतात. काही Action प्लॅन करावे लागतात. रिसॉर्स निर्माण करावे लागतात. नऊ वर्षाची सावित्री जेंव्हा आपल्या शेठजींना शेतात दुपारचे जेवण घेऊन जायच्या तेंव्हाच त्या ठिकाणी त्या स्वतःचा Future प्लॅन सेट करीत होत्या. त्या अ आ इ ई चे धडे गिरवत होत्या. माझे मिळवलेले शिक्षण फक्त माझ्या पर्यंत नं राहता ते अन्य मुलींपर्यंत पण पोहोचले पाहिजे याचा प्लॅन देखील त्यांचा महात्मा फुले यांच्या मार्फत पुढे पास होत होता. घरून हाकलून दिले तरी त्याचे action plan अगदी फिट्ट होते.या सर्व प्लॅनिंग नेच पुण्यामध्ये मुलींची शाळा निर्मिती करणे, अभ्यासक्रम निर्मिती करणे त्याला फलित रूप देणे या सर्व गोष्टींचा समावेश होता.

Organisation आयोजन या कार्यामध्ये सध्या काय काय होत आहे यावर लक्ष केंद्रित केले जाते. आमच्या सावित्री माईने शाळांची निर्मिती करून मुलींना एका प्रकारे विद्येची दारे उघडून दिली होती. मुली नियमित शाळेत आल्या पाहिजेत, त्यांच्या शाळेत येण्यात खंड पडणार नाही याची तजवीज त्या करीत. पालकांना मुलींनी शिकले पाहिजे याबाबत त्या पुढाकार घेत. त्यांनी एक दोन नाही तर १९४८ ते १९५२ या चारच वर्षात एकूण १८ शाळा खोलल्या होत्या. शक्य आहे का एकूण एवढ्या अठरा शाळांच नियोजन. जमणार का आत्ताच्या संस्थापकांना. बर मुलांकडून फी नं घेता जमणार का शाळा चालवायला. जमणार का शिक्षकांचे पगार द्यायला. या फुले दाम्पत्यांनी हे साक्षात सत्यात करून दाखवले होते. याचं सोबत त्या काळातला एक कळीचा मुद्दा होता तो म्हणजे गोर गरिबांसाठी पाण्याची सोय. त्या काळाच्या दलितांना पाणी मिळणे हे त्यांच्यासाठी जिकिरीची काम होते. सावित्रीबाईंनी त्यांच्या घरासमोरचा हौद हा सर्वांसाठी खुला केलेला होता. आपली गोष्ट अशी परक्यांसाठी देणे याला जिगरा लागतो. आणि तो घेऊनच ही माऊली जन्माला आली होती. हे होत तिचं Orgnisation.

तिच्याकडे हे सांभाळण्याची त्याचं नेतृत्वं Leadership करण्याची एक वेगळीच कला होती. तो बदलावं तिचं आणू शकली असे देखील म्हणायला हरकत नाही. तिला तिच्या शाळेच खुळ म्हणून तिच्या सासरच्यांनी घराबाहेरचा रस्ता दाखवला तेंव्हा तिने महात्मा फुले यांच्या मित्राकडे उस्मान शेख यांच्या घराला आपले निवास स्थानच बनवले नाही तर तिथे देखील शाळेची निर्मिती केली.

आज ज्या विविध समाजातील, विविध स्तरावरच्या मुली शिकतात नं ते त्यांचंच नेतृत्वं म्हणायला हरकत नाही. रोज शाळेत जाताना शेणा दगडाचा मारा व्हायचा. पण जेंव्हा समोर दांडगा माणूस येऊन उभा राहतो त्याच्या कानशीला लगावल्या शिवाय खंबीर नेतृत्वं उभ राहील नसत. आजच्या रडक्या मुलींना ती कानाखाली मारलेली हे सांगताना सावित्रीबाई फुल्यांचं खमक नेतृत्वं पुढे येताना दिसत.

Staffing म्हणजे योग्य व्यक्तीची योग्य ठिकाणी योग्य वेळेला उपलब्धी करून देणे. सावित्रीबाई फुले यांना एकटीला त्यांनी स्थापलेल्या एकूण अठरा शाळांना एकावेळी जाने शक्य नव्हते. बर महात्मा फुले यांच्या कडून पैशांची बांधणी ही शाळेतून भागणारी नव्हती. ज्योतिबा यांना शेताकडे आणि त्यांच्या त्या काळाच्या व्यवसायात रस्ते, धरण बांधणी याकडे अर्थाजन म्हणून बघावे लागतंच. मग अजून शिक्षकांची निर्मिति झालीच पाहिजे यासाठी ज्या उस्मान शेख यांच्याकडे त्या राहत होत्या त्यांच्या भगिनी फातिमा शेख यांना देखील शिकवून त्यांचे staffing सावित्रीबाई यांनी केल होत. या सर्वजणी मिळून शाळेकडे नियंत्रण करणे, अभ्यासक्रम निर्मिती करणे, शाळेत विविध धर्माच्या मुला मुलींना आणणे अशा अनेक गोष्टी करायच्या. पालकांना मुलांना शाळेत घालण्याचे पाठवण्याचे marketing देखील या सगळ्या मिळून करायच्या. अठरा शाळांच्या या संस्थापिका इतक्या प्रबळ होत्या की त्या शाळा अविरत कशा चालू राहतील टिकतील हे सगळं त्या बघायच्या. आजकालच्या संस्थापकांना शिक्षक टिकवणे, त्यांना पगार देणे हे आजही जमत नाही हे जमवून त्या काळी सावित्रीबाई फुले यांनी दाखवून दिले होते.

सर्वात शेवटचे कार्य म्हणजे controling. अजून शाळांची निर्मिती होत असताना जुन्या शाळांमध्ये अजून पट वाढवणे याकडे योग्य नियंत्रण होते. सावित्रीबाई यांनी काशीबाई नावाच्या एका ब्राम्हण स्त्रीचा मुलगा दत्तक घेतला होता. त्याला त्यांनी सजग बनवून डॉक्टर बनवला होता. ज्यावेळी पुण्यात प्लेग ची साथ आली होती. तेव्हा पुढे यशवंत डॉक्टर म्हणून लढणार होताच. पण त्याला सोबत असावी म्हणून प्लेग च्या रुग्णांची सुश्रुषा करण्यासाठी नर्स बनून सावित्रीबाई स्वतःहून पुढे आल्या. त्यांच्या येण्याने त्या प्लेग वाढण्यापासून थोडे फार नियंत्रण झाले. मात्र आमची सावित्रीमाई कालवश झाली.


मग ही सावित्रीबाई तिच्या मध्ये नियंत्रण, आयोजन, कर्मचारी उपलब्धता, नेतृत्वगुण, नियंत्रण आणि महात्मा फुले यांच्या सोबत उभे राहण्याचे Coordination होते मग आहेत ना त्या *सावित्रीबाई फुले : दि मॅनेजमेंट गुरु...*


© डॉ. अलोक पवार

३ जानेवारी २०२४

No comments:

Post a Comment

जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक

  जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक © डॉ. अलोक पवार  M.Sc. Comp. Sci. MBA, MSc Comm. Physics, MPhil, PhD जेंव्हा जेंव्हा वाणिज्य किंवा व्यवस्थाप...