जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक
© डॉ. अलोक पवार
M.Sc. Comp. Sci. MBA, MSc Comm. Physics, MPhil, PhD
जेंव्हा जेंव्हा वाणिज्य किंवा व्यवस्थापन या विषयांचा अभ्यास आपण सुरु करतो त्या व्यवस्थापनाच्या अभ्यासात आपल्याला बाहेरील देशांच्या अभ्यासू आणि त्यांनी लिहिलेल्या तथाकथित गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. भारतात राहून या सर्व अभ्यासू लोकांनी मांडलेल्या विविध मोठ्याला थेअरी त्यांचे संशोधन याचा जेंव्हा अभ्यास होतो तो चुक नसतो मात्र आपल्या इथे त्याचं सर्व थेअरी जेंव्हा आपल्या इथल्या लोकांसमोर मांडल्याचं जात नाहीत तेंव्हा आपल्या लोकांचे गमकच आपल्या लोकांपासून वंचीत राहते. आपल्या येथे पण कुशल राज्यकर्त्ये आहेत का तर आहेत. पण ठराविक पुरुष केंद्रित राज्यकर्त्यांच्या इतिहासात स्त्रियांचे राज्य आणि त्यांनी राज्य टिकवून ठेवण्यासाठी वापरलेला हातखंडा कुठेतरी कमी पडताना दिसतो. आणि त्यातच कुठेतरी आपल्याकडे ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांची जयंती जेवढ्या उत्साहाने साजरी होते तेवढ्या उत्साहाने त्यांची माता आपली माता जिजाबाई हिची जयंती तुरळक पणे काही लोक साजरी करतात. त्यांच्या जयंतीला त्या कुशल राज्यकर्ती म्हणजे एक उत्तम प्रशासक (Leader) कशा होत्या हे सांगण्याचा प्रयत्न या लेखात मी केला आहे.
महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या नावात जरी राजे असले तरी प्रमुख्याने सुरवातीला ते निजामशाहीमध्ये चाकरी करत होते. त्यांचे वडील मालोजी राजे भोसले हे देखील मुघलांच्या कडे होते. त्यांना जहागिरी म्हणून महाराष्ट्रातील पुणे ( त्याकाळाची पुणवडी) आणि सुपा हे दोन प्रांत मिळाले होते. शहाजी राजे यांना निजामांकडे चाकरी असल्याने फिरती ही नेहमीच होती. मात्र ही फिरती सपत्नीक करावी हे शक्य नव्हते म्हणून जिजाऊ यांची रवानगी पुण्यात झाली. अगदीच बालपणी विवाह झाल्याने जिजाऊंने सगळ्या गोष्टी माहेरी शिकल्या असे काहीच नव्हते. मात्र सिंदखेडा, बुलढाणा ते पुणे या प्रवासात त्यांनी शेतीवाडी बघितली होती. शेतकऱ्यांच्या कष्टांची त्यांना जाणीव होती. पुण्यात आल्यावर त्यांनी पुण्याची दयनीय अवस्था पाहिली. पुण्यात गाढवाला घेऊन शेतात नांगर फिरवला जातोय हे त्यांनी पाहिलं. इथल्या शेतकऱ्याच मरण त्यांनी पाहिलं आणि पाहिला धडा बाल शिवबांना दिला तो म्हणजे शेतीचा धडा. त्यांनी सोन्याचा नांगर तयार करून घेतला आणि तो या पुण्याच्या काळ्या मातीत नांगरून इथली माती कसदार केली. स्वतः शेतामध्ये जेंव्हा ही जिजाऊ नांगर घेऊन उडी घेते तेंव्हा ती व्यवस्थापकाचा महत्वाचा गुण 'प्रेरणा' (Influencer) समोर आणते. जो पर्यंत व्यवस्थापन प्रेरणा देत नाही तो पर्यंत बाकीचे लोक प्रेरित होऊन त्या व्यवस्थापनेत आपले काम उत्तम रित्या करीत नाही. जिजाऊंची ही प्रेरणा देण्याची कामगिरी त्यांच्या शेवटपर्यंत होती. आणि तिच प्रेरणा अजूनही आपल्याला ऊर्जा देत राहते.
सध्याच्या आयांना आपली मुले कशी घडतील याची चिंता नेहमी सतावत राहते. माझ अपत्य चांगले शिकते का? त्याला चांगली नोकरी मिळते का? त्याचे आयुष्य पुढे जाऊन योग्य होते या विचारांत आपल्याला सध्याचे पालक त्यामध्ये प्रमुख्याने आई पुढे दिसते. चिंताग्रस्त झालेली आई मुलाला कसे पुढे नेता येईल याचे गणित रात्रंदिवस बघत असते. जिजामाता यांनी देखील आपल्या बाल शिबवाला असेच काही घडवले मात्र शिवबांबरोबर त्यांना पुण्यातील इतर तरुणांची पण चिंता होती. शिवबांना मोठे करता करता त्या त्यांना रामाची कथा सांगायच्या. रामायनातील राम त्या शिवाजींच्या समोर एक महान योद्धा कसा असतो हे उलघडून सांगायच्या. त्याने कसे रामराज्य स्थापन केले, अहंकारी रावणाचा कसा अंत रामाने केला या कथा ऐकून बाल शिवाजी प्रेरित व्हायचे. भीम आणि बकासुर, कृष्ण आणि कंसाच्या गोष्टीतील नात सांगताना आपल्याच लोकांनाकडून कसा धोका असू शकतो हे देखील त्या उलघडून सांगायच्या. कदाचित त्यांच्या माहेरच्या लोकांकडून जी गद्दारीची सबब जाधव - भोसले युद्धातून मिळाली त्याचं चित्रण त्या या बाल शिवाजींच्या समोर उघडून काढत. म्हणजे प्रात्यक्षिकाबरोबर थेअरी पण किती महत्वाची आहे हे जिजाऊ आपल्या नवनिर्वाचित व्यवस्थापन कर्त्याला समजावून सांगे. नवीन व्यवस्थापक निर्मिती करणे ( Leader Development) हे आणखीन एक व्यवस्थापका चे कार्य जिजाऊंने केले असे म्हणायला हरकत नाही.
आयांची चिंता हा जेंव्हा विषय आपण बघतो तेंव्हा आपला मुलगा व्यवस्थित मार्गी कसा लागेल याचे टेन्शन त्यांना असते. जिजामातेला फक्त एका बालकाचे टेन्शन नव्हते तर संपूर्ण पुण्याचे टेन्शन त्यांना होते. पुण्यात वास्तव्यास असलेल्या लालमहालाच्या बाल्कनीतून त्यांना अवघे पुणे दिसायचे. मात्र त्याचं पुण्याच्या एका बाजूस असलेला कोंढाणा किल्ला त्यांना पुण्याच्या भीतीचे वातावरण दाखवायचा.
म्हणजे जागेपणी स्वप्न बघायचे ना तर ते जिजाऊंसारखे. त्यांनी लगेचच आपल्याला हा कोंढाणा आपल्या पुण्यात जोडायचा ही इच्छा महाराजांच्या समोर बोलून दाखवली. मुलाच्या लग्नामध्ये व्यस्त असलेल्या तानाजी मालुसरे यांना या कामगिरी मध्ये खेचण्यात आले. आणि तानाजी मालुसरे यांनी देखील या कामगिरी मध्ये ' आधी लगीन कोंढण्याचे आणि मग माझ्या रायबाचे ' ही घोषणा दिली. मात्र जेंव्हा या मोहिमेत गड काबीज करूनही तानाजी महाराजांचा बळी गेला तेंव्हा तानाजी मालुसऱ्यांची आपल्या परिवारातील शेवटचे जे कार्य अपूर्ण राहिले होते ते कार्य स्वतः जिजाऊंच्या नजरे समोर पूर्ण झाले. जिजाऊंनी स्वतः रायबाचे लग्न लावून दिले. त्याच्या पत्नीला सदिचोळीचा आहेर देऊन ते लग्न पार पाडले. गड आला पण आपला सिंह गेला यातील तानाजी ला सिंहाची उपमा मिळाली आहे त्यामधून माणसे ओळखण्याची आणि त्यांना सोबत ठेवण्याची जी परख आहे ती महाराजांना जिजाऊंकडूनच मिळाली. माणसांशिवाय थोडी व्यवस्थापन शाबूत ठेवता येते.
शिवाजी महाराज जेंव्हा वेगवेगळ्या दोऱ्यांवर जात तेंव्हा इकडे पुणे सांभाळण्याची जवाबदारी सुद्धा व्यवस्थित सांभाळत. आग्र्याची मोठी फेरी असेल किंवा युद्धाच्या वेळी आपला मुलुख सांभाळण्याची मोठी जवाबदारी म्हणायला हरकत नाही. त्यावेळी जिजाऊ मोठ्या दिमाखाने ही सर्व कामगिरी फते करीत. नाही म्हणजे ज्या जिजाऊंनी महाराजांना तलवार बाजी असेल दांडपट्टा चालण्यात तरबेज केले त्या जिजाऊंना हे फारसे अवघड काम नव्हते. एकंदरीत नियंत्रण ( Controlling) चे मोठे काम पण जिजामाता मोठ्या दिमाखाणे करीत.
राहून राहून आपण जे स्वराज्य निर्माण केलंय त्यावर आपले अधिशासन असावे ही देखील इच्छा जिजाऊंचीच. त्यामुळे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक देखील झाला पाहिजे हे आपल्या डोळ्यादेखत जिजाऊंनी पूर्ण करून घेतलेले अखेरचे स्वप्न. योग्य माणूस, मालमत्ता, मशीनरी ( साधने), पद्धती आणि चलन यांचे योग्य नियोजन त्यांनी दाखवून दिले.
अशा या कुशल व्यवस्थापिकेला माझे विनम्र अभिवादन..
डॉ. अलोक पवार
१२ जानेवारी २०२४

No comments:
Post a Comment