Thursday, 11 January 2024

जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक

 जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक

© डॉ. अलोक पवार 

M.Sc. Comp. Sci. MBA, MSc Comm. Physics, MPhil, PhD

जेंव्हा जेंव्हा वाणिज्य किंवा व्यवस्थापन या विषयांचा अभ्यास आपण सुरु करतो त्या व्यवस्थापनाच्या अभ्यासात आपल्याला बाहेरील देशांच्या अभ्यासू आणि त्यांनी लिहिलेल्या तथाकथित गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. भारतात राहून या सर्व अभ्यासू लोकांनी मांडलेल्या विविध मोठ्याला थेअरी त्यांचे संशोधन याचा जेंव्हा अभ्यास होतो तो चुक नसतो मात्र आपल्या इथे त्याचं सर्व थेअरी जेंव्हा आपल्या इथल्या लोकांसमोर मांडल्याचं जात नाहीत तेंव्हा आपल्या लोकांचे गमकच आपल्या लोकांपासून वंचीत राहते. आपल्या येथे पण कुशल राज्यकर्त्ये आहेत का तर आहेत. पण ठराविक पुरुष केंद्रित राज्यकर्त्यांच्या इतिहासात स्त्रियांचे राज्य आणि त्यांनी राज्य टिकवून ठेवण्यासाठी वापरलेला हातखंडा कुठेतरी कमी पडताना दिसतो. आणि त्यातच कुठेतरी आपल्याकडे ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांची जयंती जेवढ्या उत्साहाने साजरी होते तेवढ्या उत्साहाने त्यांची माता आपली माता जिजाबाई हिची जयंती तुरळक पणे काही लोक साजरी करतात. त्यांच्या जयंतीला त्या कुशल राज्यकर्ती म्हणजे एक उत्तम प्रशासक (Leader) कशा होत्या हे सांगण्याचा प्रयत्न या लेखात मी केला आहे.



महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या नावात जरी राजे असले तरी प्रमुख्याने सुरवातीला ते निजामशाहीमध्ये चाकरी करत होते. त्यांचे वडील मालोजी राजे भोसले हे देखील मुघलांच्या कडे होते. त्यांना जहागिरी म्हणून महाराष्ट्रातील पुणे ( त्याकाळाची पुणवडी) आणि सुपा हे दोन प्रांत मिळाले होते. शहाजी राजे यांना निजामांकडे चाकरी असल्याने फिरती ही नेहमीच होती. मात्र ही फिरती सपत्नीक करावी हे शक्य नव्हते म्हणून जिजाऊ यांची रवानगी पुण्यात झाली. अगदीच बालपणी विवाह झाल्याने जिजाऊंने सगळ्या गोष्टी माहेरी शिकल्या असे काहीच नव्हते. मात्र सिंदखेडा, बुलढाणा ते पुणे या प्रवासात त्यांनी शेतीवाडी बघितली होती. शेतकऱ्यांच्या कष्टांची त्यांना जाणीव होती. पुण्यात आल्यावर त्यांनी पुण्याची दयनीय अवस्था पाहिली. पुण्यात गाढवाला घेऊन शेतात नांगर फिरवला जातोय हे त्यांनी पाहिलं. इथल्या शेतकऱ्याच मरण त्यांनी पाहिलं आणि पाहिला धडा बाल शिवबांना दिला तो म्हणजे शेतीचा धडा. त्यांनी सोन्याचा नांगर तयार करून घेतला आणि तो या पुण्याच्या काळ्या मातीत नांगरून इथली माती कसदार केली. स्वतः शेतामध्ये जेंव्हा ही जिजाऊ नांगर घेऊन उडी घेते तेंव्हा ती व्यवस्थापकाचा महत्वाचा गुण 'प्रेरणा' (Influencer) समोर आणते. जो पर्यंत व्यवस्थापन प्रेरणा देत नाही तो पर्यंत बाकीचे लोक प्रेरित होऊन त्या व्यवस्थापनेत आपले काम उत्तम रित्या करीत नाही. जिजाऊंची ही प्रेरणा देण्याची कामगिरी त्यांच्या शेवटपर्यंत होती. आणि तिच प्रेरणा अजूनही आपल्याला ऊर्जा देत राहते.

सध्याच्या आयांना आपली मुले कशी घडतील याची चिंता नेहमी सतावत राहते. माझ अपत्य चांगले शिकते का? त्याला चांगली नोकरी मिळते का? त्याचे आयुष्य पुढे जाऊन योग्य होते या विचारांत आपल्याला सध्याचे पालक त्यामध्ये प्रमुख्याने आई पुढे दिसते. चिंताग्रस्त झालेली आई मुलाला कसे पुढे नेता येईल याचे गणित रात्रंदिवस बघत असते. जिजामाता यांनी देखील आपल्या बाल शिबवाला असेच काही घडवले मात्र शिवबांबरोबर त्यांना पुण्यातील इतर तरुणांची पण चिंता होती. शिवबांना मोठे करता करता त्या त्यांना रामाची कथा सांगायच्या. रामायनातील राम त्या शिवाजींच्या समोर एक महान योद्धा कसा असतो हे उलघडून सांगायच्या. त्याने कसे रामराज्य स्थापन केले, अहंकारी रावणाचा कसा अंत रामाने केला या कथा ऐकून बाल शिवाजी प्रेरित व्हायचे. भीम आणि बकासुर, कृष्ण आणि कंसाच्या गोष्टीतील नात सांगताना आपल्याच लोकांनाकडून कसा धोका असू शकतो हे देखील त्या उलघडून सांगायच्या. कदाचित त्यांच्या माहेरच्या लोकांकडून जी गद्दारीची सबब जाधव - भोसले युद्धातून मिळाली त्याचं चित्रण त्या या बाल शिवाजींच्या समोर उघडून काढत. म्हणजे प्रात्यक्षिकाबरोबर थेअरी पण किती महत्वाची आहे हे जिजाऊ आपल्या नवनिर्वाचित व्यवस्थापन कर्त्याला समजावून सांगे. नवीन व्यवस्थापक निर्मिती करणे ( Leader Development) हे आणखीन एक व्यवस्थापका चे कार्य जिजाऊंने केले असे म्हणायला हरकत नाही.

आयांची चिंता हा जेंव्हा विषय आपण बघतो तेंव्हा आपला मुलगा व्यवस्थित मार्गी कसा लागेल याचे टेन्शन त्यांना असते. जिजामातेला फक्त एका बालकाचे टेन्शन नव्हते तर संपूर्ण पुण्याचे टेन्शन त्यांना होते. पुण्यात वास्तव्यास असलेल्या लालमहालाच्या बाल्कनीतून त्यांना अवघे पुणे दिसायचे. मात्र त्याचं पुण्याच्या एका बाजूस असलेला कोंढाणा किल्ला त्यांना पुण्याच्या भीतीचे वातावरण दाखवायचा.

म्हणजे जागेपणी स्वप्न बघायचे ना तर ते जिजाऊंसारखे. त्यांनी लगेचच आपल्याला हा कोंढाणा आपल्या पुण्यात जोडायचा ही इच्छा महाराजांच्या समोर बोलून दाखवली. मुलाच्या लग्नामध्ये व्यस्त असलेल्या तानाजी मालुसरे यांना या कामगिरी मध्ये खेचण्यात आले. आणि तानाजी मालुसरे यांनी देखील या कामगिरी मध्ये ' आधी लगीन कोंढण्याचे आणि मग माझ्या रायबाचे ' ही घोषणा दिली. मात्र जेंव्हा या मोहिमेत गड काबीज करूनही तानाजी महाराजांचा बळी गेला तेंव्हा तानाजी मालुसऱ्यांची आपल्या परिवारातील शेवटचे जे कार्य अपूर्ण राहिले होते ते कार्य स्वतः जिजाऊंच्या नजरे समोर पूर्ण झाले. जिजाऊंनी स्वतः रायबाचे लग्न लावून दिले. त्याच्या पत्नीला सदिचोळीचा आहेर देऊन ते लग्न पार पाडले. गड आला पण आपला सिंह गेला यातील तानाजी ला सिंहाची उपमा मिळाली आहे त्यामधून माणसे ओळखण्याची आणि त्यांना सोबत ठेवण्याची जी परख आहे ती महाराजांना जिजाऊंकडूनच मिळाली. माणसांशिवाय थोडी व्यवस्थापन शाबूत ठेवता येते.

शिवाजी महाराज जेंव्हा वेगवेगळ्या दोऱ्यांवर जात तेंव्हा इकडे पुणे सांभाळण्याची जवाबदारी सुद्धा व्यवस्थित सांभाळत. आग्र्याची मोठी फेरी असेल किंवा युद्धाच्या वेळी आपला मुलुख सांभाळण्याची मोठी जवाबदारी म्हणायला हरकत नाही. त्यावेळी जिजाऊ मोठ्या दिमाखाने ही सर्व कामगिरी फते करीत. नाही म्हणजे ज्या जिजाऊंनी महाराजांना तलवार बाजी असेल दांडपट्टा चालण्यात तरबेज केले त्या जिजाऊंना हे फारसे अवघड काम नव्हते. एकंदरीत नियंत्रण ( Controlling) चे मोठे काम पण जिजामाता मोठ्या दिमाखाणे करीत.

राहून राहून आपण जे स्वराज्य निर्माण केलंय त्यावर आपले अधिशासन असावे ही देखील इच्छा जिजाऊंचीच. त्यामुळे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक देखील झाला पाहिजे हे आपल्या डोळ्यादेखत जिजाऊंनी पूर्ण करून घेतलेले अखेरचे स्वप्न. योग्य माणूस, मालमत्ता, मशीनरी ( साधने), पद्धती आणि चलन यांचे योग्य नियोजन त्यांनी दाखवून दिले.

अशा या कुशल व्यवस्थापिकेला माझे विनम्र अभिवादन..

डॉ. अलोक पवार

१२ जानेवारी २०२४

Wednesday, 3 January 2024

सावित्रीबाई फुले : दि मॅनेजमेंट गुरु

 सावित्रीबाई फुले : दि मॅनेजमेंट गुरु

© डॉ. अलोक पवार



आज सावित्रीबाई फुले यांच्या विषयी काहीतरी वेगळे विचार मांडावेसे वाटले. "सावित्रीबाई फुले : दि मॅनेजमेंट गुरु", हा म्हणजे त्या काळी एम. बी.ए. अशी पदवी भारतामध्ये अस्तित्वातच नव्हती. आणि स्त्री असलेल्या सावित्रीबाईंनी ती मिळवली होती असेही नव्हते. मात्र तरीही सावित्रीबाईंना मॅनेजमेंट गुरु म्हणणे हे थोडे विचार करण्यासारखे नाही. एखाद्याला खरे व्यवस्थापन कळले आणि त्या व्यवस्थापनातील कार्य त्याला व्यवस्थित रित्या कळली तर तो मॅनेजमेंट गुरु म्हणून गणला जातो. आमच्या मॅनेजमेंट मध्ये पाच कार्य अतिशय महत्वाची म्हणून समोर येतात, प्लॅनिंग ( नियोजन), ऑर्गनिझिंग ( आयोजन), स्टाफिंग ( कर्मचारी जोपासना), लीडिंग ( नेतृत्व) आणि शेवटचा कंट्रोलिंग ( नियंत्रण) या पाचही कार्यांकडे बघता या सावित्रीबाई फुले यांची जीवन गाथा कशी समर्पक आहे हे दिसून येते.

प्लॅनिंग या कार्यामध्ये काही Goal निर्माण करावे लागतात. काही Action प्लॅन करावे लागतात. रिसॉर्स निर्माण करावे लागतात. नऊ वर्षाची सावित्री जेंव्हा आपल्या शेठजींना शेतात दुपारचे जेवण घेऊन जायच्या तेंव्हाच त्या ठिकाणी त्या स्वतःचा Future प्लॅन सेट करीत होत्या. त्या अ आ इ ई चे धडे गिरवत होत्या. माझे मिळवलेले शिक्षण फक्त माझ्या पर्यंत नं राहता ते अन्य मुलींपर्यंत पण पोहोचले पाहिजे याचा प्लॅन देखील त्यांचा महात्मा फुले यांच्या मार्फत पुढे पास होत होता. घरून हाकलून दिले तरी त्याचे action plan अगदी फिट्ट होते.या सर्व प्लॅनिंग नेच पुण्यामध्ये मुलींची शाळा निर्मिती करणे, अभ्यासक्रम निर्मिती करणे त्याला फलित रूप देणे या सर्व गोष्टींचा समावेश होता.

Organisation आयोजन या कार्यामध्ये सध्या काय काय होत आहे यावर लक्ष केंद्रित केले जाते. आमच्या सावित्री माईने शाळांची निर्मिती करून मुलींना एका प्रकारे विद्येची दारे उघडून दिली होती. मुली नियमित शाळेत आल्या पाहिजेत, त्यांच्या शाळेत येण्यात खंड पडणार नाही याची तजवीज त्या करीत. पालकांना मुलींनी शिकले पाहिजे याबाबत त्या पुढाकार घेत. त्यांनी एक दोन नाही तर १९४८ ते १९५२ या चारच वर्षात एकूण १८ शाळा खोलल्या होत्या. शक्य आहे का एकूण एवढ्या अठरा शाळांच नियोजन. जमणार का आत्ताच्या संस्थापकांना. बर मुलांकडून फी नं घेता जमणार का शाळा चालवायला. जमणार का शिक्षकांचे पगार द्यायला. या फुले दाम्पत्यांनी हे साक्षात सत्यात करून दाखवले होते. याचं सोबत त्या काळातला एक कळीचा मुद्दा होता तो म्हणजे गोर गरिबांसाठी पाण्याची सोय. त्या काळाच्या दलितांना पाणी मिळणे हे त्यांच्यासाठी जिकिरीची काम होते. सावित्रीबाईंनी त्यांच्या घरासमोरचा हौद हा सर्वांसाठी खुला केलेला होता. आपली गोष्ट अशी परक्यांसाठी देणे याला जिगरा लागतो. आणि तो घेऊनच ही माऊली जन्माला आली होती. हे होत तिचं Orgnisation.

तिच्याकडे हे सांभाळण्याची त्याचं नेतृत्वं Leadership करण्याची एक वेगळीच कला होती. तो बदलावं तिचं आणू शकली असे देखील म्हणायला हरकत नाही. तिला तिच्या शाळेच खुळ म्हणून तिच्या सासरच्यांनी घराबाहेरचा रस्ता दाखवला तेंव्हा तिने महात्मा फुले यांच्या मित्राकडे उस्मान शेख यांच्या घराला आपले निवास स्थानच बनवले नाही तर तिथे देखील शाळेची निर्मिती केली.

आज ज्या विविध समाजातील, विविध स्तरावरच्या मुली शिकतात नं ते त्यांचंच नेतृत्वं म्हणायला हरकत नाही. रोज शाळेत जाताना शेणा दगडाचा मारा व्हायचा. पण जेंव्हा समोर दांडगा माणूस येऊन उभा राहतो त्याच्या कानशीला लगावल्या शिवाय खंबीर नेतृत्वं उभ राहील नसत. आजच्या रडक्या मुलींना ती कानाखाली मारलेली हे सांगताना सावित्रीबाई फुल्यांचं खमक नेतृत्वं पुढे येताना दिसत.

Staffing म्हणजे योग्य व्यक्तीची योग्य ठिकाणी योग्य वेळेला उपलब्धी करून देणे. सावित्रीबाई फुले यांना एकटीला त्यांनी स्थापलेल्या एकूण अठरा शाळांना एकावेळी जाने शक्य नव्हते. बर महात्मा फुले यांच्या कडून पैशांची बांधणी ही शाळेतून भागणारी नव्हती. ज्योतिबा यांना शेताकडे आणि त्यांच्या त्या काळाच्या व्यवसायात रस्ते, धरण बांधणी याकडे अर्थाजन म्हणून बघावे लागतंच. मग अजून शिक्षकांची निर्मिति झालीच पाहिजे यासाठी ज्या उस्मान शेख यांच्याकडे त्या राहत होत्या त्यांच्या भगिनी फातिमा शेख यांना देखील शिकवून त्यांचे staffing सावित्रीबाई यांनी केल होत. या सर्वजणी मिळून शाळेकडे नियंत्रण करणे, अभ्यासक्रम निर्मिती करणे, शाळेत विविध धर्माच्या मुला मुलींना आणणे अशा अनेक गोष्टी करायच्या. पालकांना मुलांना शाळेत घालण्याचे पाठवण्याचे marketing देखील या सगळ्या मिळून करायच्या. अठरा शाळांच्या या संस्थापिका इतक्या प्रबळ होत्या की त्या शाळा अविरत कशा चालू राहतील टिकतील हे सगळं त्या बघायच्या. आजकालच्या संस्थापकांना शिक्षक टिकवणे, त्यांना पगार देणे हे आजही जमत नाही हे जमवून त्या काळी सावित्रीबाई फुले यांनी दाखवून दिले होते.

सर्वात शेवटचे कार्य म्हणजे controling. अजून शाळांची निर्मिती होत असताना जुन्या शाळांमध्ये अजून पट वाढवणे याकडे योग्य नियंत्रण होते. सावित्रीबाई यांनी काशीबाई नावाच्या एका ब्राम्हण स्त्रीचा मुलगा दत्तक घेतला होता. त्याला त्यांनी सजग बनवून डॉक्टर बनवला होता. ज्यावेळी पुण्यात प्लेग ची साथ आली होती. तेव्हा पुढे यशवंत डॉक्टर म्हणून लढणार होताच. पण त्याला सोबत असावी म्हणून प्लेग च्या रुग्णांची सुश्रुषा करण्यासाठी नर्स बनून सावित्रीबाई स्वतःहून पुढे आल्या. त्यांच्या येण्याने त्या प्लेग वाढण्यापासून थोडे फार नियंत्रण झाले. मात्र आमची सावित्रीमाई कालवश झाली.


मग ही सावित्रीबाई तिच्या मध्ये नियंत्रण, आयोजन, कर्मचारी उपलब्धता, नेतृत्वगुण, नियंत्रण आणि महात्मा फुले यांच्या सोबत उभे राहण्याचे Coordination होते मग आहेत ना त्या *सावित्रीबाई फुले : दि मॅनेजमेंट गुरु...*


© डॉ. अलोक पवार

३ जानेवारी २०२४

जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक

  जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक © डॉ. अलोक पवार  M.Sc. Comp. Sci. MBA, MSc Comm. Physics, MPhil, PhD जेंव्हा जेंव्हा वाणिज्य किंवा व्यवस्थाप...